Sunday 5 August 2012

हळव मन..


तु दिलेलं दु:ख जास्त आहे की माझं मनच हळवं आहे..
कोण जाणे..
पण भावनांना अश्रूरूपी बाहेर पडायला मनाई ना दु:खाची आहे ना मनाची..
कोण म्हणतं अभिव्यक्त झाल्यावर मन शांत होतं...ते तर गलबला करतंय..
तडफड कमी व्हायच्या ऐवजी वाढतेचं आहे..
ते अभिव्यक्त होणं चुकीचं का होत...
का चुकीच्या रितीने अभिव्यक्त होत होतं मन..
सार आकालनिय व्हावं... असं का आहे नियतीच्या मनात..
नियतीच्या मनात सर्व अकालनीयच का असावं..
प्रश्नांची उत्तर कधी तरी मिळावित का नाही..
मात्र उत्तर मिळावित असं वाटतं का नाही..
कोणी तरी द्यावीत की नाही..
दिली तरी ती पटतीलच असंही नाही
काहीही झालं तरी मन दु:खाकडेच का धांव घेतं
आपलां हळवे पणा दु:खाकडेच का उघड करतं
त्रास होतोय समजूनही खोलात पाय का रुततं जातोय....
कोण जाणे??????

?
२८.७.२०१२

No comments:

Post a Comment