नको आता काहीच बोलु...
नकोस आता शब्द्फुले तोलु..
क्षण सगळे वाहून गेले..
निरर्थक ओझे उरले..
कोरड्यां शब्दांत आता
शोधू नको अर्थ जराही..
शुष्क रित्या मनातून
मोह अश्रुंनी वाहून गेले...
उजाडणार नाहीच आता.
अंधारात वाट सरणार नाही..
परत असाच टाकून ओझे...
डोळे मी मिटून घेतले...
छाया
१४.८.२०१२
No comments:
Post a Comment