सुखाचा मोह माणसाला
जगण्याच बळ देत असतो...
म्हणूनचं माझं
तुझ्यावरचं प्रेम हे माझ्यासाठी पुरे नाही तर..
तुही एक दिवस मला
आपलं म्हणशील...
तुझे हात मला सावरतील...जगण्याचं
बळ देतील...
हा मोह मनात बाळगून
आहे...
मला माहिती आहे
हे होणार आहे..
पण कधी हे माहिती
नाही...
हा मोह क्षणोक्षणी
आवर्तने घेत असतो मनात..
हे होणार..होणारचं....
हया मोहाने मला
जगण्याचं बळ मिळतं रहातं एवढं नक्की..
नाहीतर...नाहीतर
खरंच काय प्रयोजन आहे मला जगण्यांच?
मरण्याचं कारण
नाही म्हणून?
अरे..पण तसं जगणं
तर ...
तसं जगणं तर पशु-पक्ष्यांच
जगण झालं ना..
मी हाडांमासांचंच
नाही तर भावभावना असलेलं मानवी जीवन जगत आहे...
मग सुखाचा मोह
होणं स्वाभाविक नाही का?
आता एक आहे..
जगण्यासाठी प्रयोजन
आहे..आणि..
आणि म्हणूनच मी
आनंदात आहे.....तुझ्या आठवणींत सुखात आहे...
?
५.८.२०१२
No comments:
Post a Comment